ब्रेकिंग न्यूज

मद्यधुंद महिलेचा पोलीस चौकीत गोधळ, नऱ्हे पोलीस चौकीतील घटना

पुणे – एका मद्यधुंद महिलेने तब्बल दोन ते तीन तास पोलीस चौकीत प्रचंड गोंधळ घातला. ही घटना नऱ्हे पोलीस चौकीमध्ये घडली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नऱ्हे परिसरातील रस्त्यावर ही महिला मद्याच्या नशेत धुंद होऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार रात्री गस्तीवर…

Read More

विषारी दारू दुर्घटना प्रकरणी दोन पोलीस अधिकारी निलंबित

विषारी दारू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपीच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून दोन बड्या पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पुणे अवैध विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापतीच्या संपर्कात असल्याचे कॉल रेकॉर्ड समोर आल्यानंतर उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी अजित शिवाजी काळे आणि सुमित नंदकुमार वाघ यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे….

Read More

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विषारी दारू दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांची घेतली भेट 

दापोडी – विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे व शिवसेना उपनेते कामगार नेते इरफान सय्यद यांची घटनास्थळी भेट पुण्यातील दापोडी व फुगेवाडी या परिसरात विषारी दारूच्या सेवनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना घडली. विषारी दारूच्या सेवनाने मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग…

Read More

शिवनेर पतसंस्थेला 1 कोटी 20 लाखांचा नफा 

पिंपरी – भोसरी येथील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेला 2025- 26 या आर्थिक वर्षांमध्ये 1 कोटी 20 लाख 59 हजार 356 इतका निव्वळ नफा झाला आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ यांनी दिली. संस्थेचे एकूण 4403 इतके सभासद असून रु. 2 कोटी 76 लाख 78 हजार 250 इतके भागभांडवल आहे. संस्थेकडे रु. 39 कोटी 95…

Read More

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन

मुंबई- आपल्या मधुर आणि सुश्राव्य आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला असून संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेले योगदान…

Read More

विकृत प्रकरणात पंतप्रधानांचे नाव आपण सहन करतो हा आपल्या सहनशीलतेचा पराकोट – हर्षवर्धन सपकाळ

पिंपरी- एफस्टिन फाईल सारख्या विकृत प्रकरणात आपल्या पंतप्रधानांचे नाव असल्यावरही आपण त्यांना सहन करतोय, हा आपल्या सहनशीलतेचा पराकोट आहे. आता रस्त्यावर सविनय उतरल्याशिवाय, सत्याग्रहाशिवाय कोणताही मार्ग दिसत नाही. आता आपण दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याला तयार आहोत का ? या प्रश्नाचे सगळ्यांनी चिंतन करावे. जर आपण जिवंत असाल, मेलेलो नाही अशी स्वतःला खात्री असेल तर आता सर्वजण…

Read More

सर्वधर्मसमभाव हाच खरा राष्ट्रवाद – विजय तांबे

पिंपरी- सर्वधर्मसमभाव हीच भारताची ओळख आणि हाच खरा राष्ट्रवाद आहे. १८८५ मध्ये जात, धर्म, भाषा, वर्ण, रंग, वंश हे सर्व सोडून हिंदू, पारशी, ख्रिश्चन, मुसलमान, शीख समाजातील नागरिक एकत्र येऊन त्यांनी काँग्रेसची स्थापना केली. हीच भारत राष्ट्र उभारणीची सुरुवात होय. भारतात एकत्वाची भावना निर्माण करून त्याचे नेतृत्व करण्याचे काम महात्मा गांधीजींनी केले.दलित समाजाला आत्मसन्मान मिळवून…

Read More

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान प्रदान

पिंपरी -‘कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नावाचा जीवनगौरव सन्मान मिळाल्याने मी कृतार्थ झालो आहे. राळेगणसिद्धी हे गाव आदर्शगाव होण्यासाठी टाटा मोटर्सचे निवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर यांचे फार मोठे योगदान आहे!’ अशी कृतज्ञतेची भावना ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी आदर्शगाव राळेगणसिद्धी येथे व्यक्त केली. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने अण्णा…

Read More

आनंदाचा बटवा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न

पिंपरी – ”आनंदाचा बटवा’ या काव्यसंग्रहातून वाचकांनी आनंद घ्यावा आणि इतरांनाही आनंद वाटून जीवनाचा प्रवास समाजाचे ऋण फेडत समाधानाकडे वाटचाल करणारा ठरावा!’ असे विचार डाॅ. संजय जगताप यांनी तारांगण सभागृह, सायन्स पार्क, चिंचवड येथे व्यक्त केले. कवी संजय होनकळस लिखित आणि काव्यमित्र संस्था आयोजित ‘आनंदाचा बटवा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना डॉ. संजय जगताप बोलत होते….

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन हे केवळ आर्थिक नव्हे,तर राष्ट्रीय जबाबदारीचे प्रतीक – कामगारनेते यशवंतभाऊ भोसले

पिंपरी:– जगामध्ये सध्या सुरु असलेल्या आखाती युद्धामुळे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असून, त्याची झळ भारतासारख्या विकसनशील देशांनाही बसत आहे. कच्च्या तेलाचे वाढते दर, मजबूत होत चाललेला अमेरिकन डॉलर, रुपयाची घसरण आणि आयात खर्चातील वाढ यामुळे भारतातील महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.  पंतप्रधान  नरेंद्र मोदी  यांनी देशहिताच्या दृष्टीने नागरिकांना सोने-चांदी खरेदी, पेट्रोल-डिझेल वापर तसेच…

Read More