ब्रेकिंग न्यूज

राज्य मंत्रीमंडळाची शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला मंजुरी

मुंबई – राज्यातील लाखो शेतकरी ज्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत होते, त्या शेतकरी कर्जमाफी योजनेला अखेर राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने आपला…

Read More

सुनील टिंगरे यांची नाराजी दूर करण्यात पार्थ पवार यशस्वी 

पुणे – स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये नाराजी नाट्य रंगले होते. संजय काकडे यांना उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांची नाराजी दूर करण्यात पार्थ पवार यांना यश आले आहे. पुण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत संजय काकडे यांचा मुलगा विक्रम काकडे यांना महायुतीची उमेदवारी मिळाल्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे…

Read More

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन

मुंबई- आपल्या मधुर आणि सुश्राव्य आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला असून संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेले योगदान…

Read More

भावडी गावची कन्या ऋतुजा मोरे पोलिस दलात दाखल

पिंपरी – आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरात असलेल्या भावडी गावातील ऋतुजा बारकु मोरे हिने महाराष्ट्र पोलिस दलात पुणे शहर पोलिस पदावर निवड मिळवत गावच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे. भावडी गावातून पोलिस सेवेत दाखल होणारी ती पहिली महिला ठरली असून,तिच्या या यशामुळे सातगाव पठार परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. वडिलांचे छत्र हरवल्यानंतरही …

Read More

तब्बल पन्नास वर्षांनंतर एकत्र आले शाळासोबती…

पिंपरी – सोशल मीडिया अर्थातच समाजमाध्यमाचा सकारात्मक उपयोग करून काकडे पार्क, चिंचवडगाव येथील ज्येष्ठ नागरिक रमेश कुलकर्णी आणि पुणेस्थित वैशाली क्षीरसागर यांनी दोन ते तीन महिन्यांच्या अथक परिश्रम, चिकाटी अन् अपूर्व उत्साहाच्या बळावर छत्रपती संभाजी विद्यालय, शिवनगर, तालुका कराड, जिल्हा सातारा येथील सन १९४६ ते १९६३ या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांचा शोध घेऊन आपल्या शाळासोबत्यांचा व्हॉट्सॲप…

Read More

शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी – किरणजीत सिंग

पिंपरी, पुणे – शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी होते. बंदूक आणि तलवारीच्या जोरावर, ब्रिटिशांना भारतातून घालवून खरे स्वातंत्र्य मिळणार नाही, तर पूर्ण व्यवस्थाच बदलली पाहिजे. आत्ताचे स्वातंत्र्य हे भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद या क्रांतीकारकांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य नाही. त्यांना जातवाद, धर्मवाद, प्रांतवाद, भ्रष्टाचार मान्य नव्हता. आता होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांमुळे ते व्यथीत झाले असते….

Read More

राज्यपाल आणि उप मुख्यमंत्री यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सन्मान….

पिंपरी :- पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि हरित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावत सलग तिसऱ्यांदा अव्वल स्थान मिळविले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महापालिकेस १० कोटीचे बक्षिस जाहिर झाले असून आज राज्यस्तरीय आयोजीत सन्मान सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत व उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या…

Read More

ब्राझीलच्या शिष्टमंडळाचा भारत दौरा, पुणे-स्थित भारतीय सामाजिक संस्था – “अराउकेरिया डेक्कन इंटरनॅशनल फाउंडेशन” सोबत सहकार्याची घोषणा

पुणे – पराना राज्य (ब्राझील) येथील एका उच्च-स्तरीय शिष्टमंडळाने, ज्याचे नेतृत्व अराउकेरिया फाउंडेशनचे (पराना राज्य सरकारच्या निधी देणारी संस्था, ब्राझील) अध्यक्ष  रामिरो वारहाफ्टिग यांनी केले, आणि ज्यात संचालक सुश्री क्रिस्टियान, डॉ. जॉर्ज एडिसन रिबेरो यांचा समावेश होता, त्यांनी भारतीय सामाजिक संस्था “अराउकेरिया डेक्कन इंटरनॅशनल फाउंडेशन” सोबत एका महत्त्वपूर्ण सहकार्याची घोषणा करण्यासाठी भारताला भेट दिली. हा…

Read More

पवना नदी व रेल्वे उड्डाणपुलाच्या संदर्भात संदीप वाघेरे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन

पिंपरी प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड शहरातील विविध समस्या आणि त्यावर सुसंगत उपाययोजनांसाठी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. ज्यामध्ये पवना नदी सुधार प्रकल्पास गती देणे आणि पिंपरी मिलिट्री डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे यांचा समावेश होता. पवना नदी सुधार प्रकल्पाच्या कामांना गती देण्याबाबत नगरसेवक संदीप…

Read More

ओबीसी जनगणनेचे महत्त्व घरोघरी जाऊन सांगणार – समीर भुजबळ

पिंपरी, पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश पातळीवर ओबीसी समाजाची जनगणना करण्याचे जाहीर केले आहे. ही जनगणना झाल्यानंतर ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतींसह आरक्षण, शासकीय, निमशासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण, केंद्र व राज्य सरकारच्या ओबीसींसाठी असणाऱ्या विविध योजनांचा लाभ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण मिळेल. हे लाभ समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचल्यानंतर ओबीसी समाज खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रवाहात…

Read More