ब्रेकिंग न्यूज

स्वच्छ वायू सर्वेक्षण : पुणे देशात १२ व्या क्रमांकावर, तर खराडी-वाघोली आणि गोखलेनगर-औंध या प्रभागांना राज्यस्तरावर विशेष मान्यता

पुणे- केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६ (नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम – NCAP) अंतर्गत दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात पुण्याने २०० पैकी १८३ गुण मिळवून राष्ट्रीय स्तरावर बारावा क्रमांक पटकाविला आहे. तर स्थानिक कामगिरीमध्ये पुण्यातील प्रभाग ४ (खराडी-वाघोली) आणि प्रभाग ७ (गोखलेनगर-औंध) यांना राज्यस्तरावर विशेष मान्यता मिळाली आहे. ‘एनसीएपी’तर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले….

Read More

जगप्रसिद्ध कास पठार १ सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी खुले! 

सातारा- पर्यटकांचे आकर्षण असलेले जगप्रसिद्ध कास पुष्पपठार १ सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी खुले होणार आहे त्यासाठी वनविभाग सज्ज झाला असून फुलांच्या बहरासोबतच यंदा पर्यटकांना निसर्गाचा नवा अनुभव देणारे आकर्षक पॉइंटही विकसित करण्यात आले आहेत. वनविभाग आणि कास समितीच्या पुढाकारातून गेल्या काही दिवसांपासून पठारावर विविध विकासकामे हाती घेण्यात आली होती. त्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली असून, पर्यावरणपूरक आणि…

Read More

पुणेकरांसाठी खुश खबर, ताम्हिणी घाट वाहतुकीसाठी खुला. पण…..

पुणे – पुण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. जुलै महिन्यातील मुसळधार पावसामुळे दरडी कोसळल्याने आणि छोटा साकव वाहून गेल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला ताम्हिणी घाट पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.   दरवर्षी पावसाळ्यात ताम्हिणी घाटातील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी हजारो पर्यटक गर्दी करतात. मार्ग बंद असल्याने स्थानिक पर्यटनावर आधारित छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला…

Read More

कळसूबाई शिखरावर रात्रीच्या अंधारात वाट चुकलेल्या आठ पर्यटकांची सुटका

अकोले- कळसुबाई, हरिश्चंद्र गडावर ट्रेकसाठी गेले असताना रात्रीच्या अंधारात वाट चुकलेल्या मुंबईच्या आठ पर्यटकांची वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप सुटका केली. याबाबतची माहिती अशी की, मुंबईतील चार पर्यटक कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी बुधवारी आले होते. सोबत कुणीही वाटाड्या किंवा माहितगार माणूस न घेता हे कळसुबाई शिखराच्या दिशेने निघाले. वाटेत हिरवागार निसर्ग, अधून मधून पावसाच्या सरींचा आनंद घेत…

Read More

पुणे नाशिक रेल्वेमार्ग नारायणगाव, संगमनेर मार्गेच व्हावा – खासदार डॉ. अमोल कोल्हे

पुणे – पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संदर्भात जीएमआरटीचे आक्षेप समजून घेण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याबद्दल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना नेमकं ‘झारीतील शुक्राचार्य’ कोण आहेत असा सवाल विचारला, त्याचबरोबर हा रेल्वे प्रकल्प जुन्या मार्गानेच व्हावा ही आपली स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे नाशिक सेमी हायस्पीड…

Read More

पुणे विमानतळावरून आता अधिक शहरांसाठी थेट उड्डाणे

पुणे- पुणे विमानतळावरून आता अधिक शहरांसाठी थेट उड्डाणे सुरू होणार आहेत. पुणे विमानतळावरील दैनंदिन उड्डाण्णांची कमाल मर्यादा 220 वरून 235 पर्यंत वाढवली आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे.  विमानतळावरील गर्दी आणि वाढती मागणी लक्षात घेऊन मोहोळ यांनी 19 मार्च 2025 रोजी भारतीय हवाई दलाकडे स्लॉट वाढवण्याची…

Read More

संवर्धनानंतर रांजणगाव महागणपती मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले ! दर्शनासाठी भाविकांची गर्दी

संवर्धनानंतर रांजणगाव महागणपती मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले ! दर्शनासाठी भाविकांची गर्दी रांजणगाव – अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती येथील श्री महागणपती मंदिरात महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागातर्फे केलेल्या जतन व संवर्धनाच्या कामांनंतर शनिवार (दि.१) रोजी पहाटे मंदिर पुन्हा भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिरातील जतन व संवर्धनाच्या कामासाठी १५ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत…

Read More

पीएमपीएमएल बसमधून फक्त ५०० रुपयात घ्या ताम्हिणी घाटातील निसर्गाचा आनंद

पुणे- सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने वर्षा सहलीचा आनंद घेत आहेत. पुणेकर पर्यटन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. फक्त ५०० रुपयांमध्ये पुणेकरांना मुळशी, ताम्हिणी घाटातील निसर्गाचा आनंद घेता येणार आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने त्यासाठी एका विशेष बसचे नियोजन केले आहे. पीएमपीने ९ अ हा नवीन जलद मार्ग सुरु केला आहे. या नवीन विशेष बसचा…

Read More