ब्रेकिंग न्यूज

शिवनेर पतसंस्थेला 1 कोटी 20 लाखांचा नफा 

पिंपरी – भोसरी येथील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेला 2025- 26 या आर्थिक वर्षांमध्ये 1 कोटी 20 लाख 59 हजार 356 इतका निव्वळ नफा झाला आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ यांनी दिली. संस्थेचे एकूण 4403 इतके सभासद असून रु. 2 कोटी 76 लाख 78 हजार 250 इतके भागभांडवल आहे. संस्थेकडे रु. 39 कोटी 95…

Read More

विकृत प्रकरणात पंतप्रधानांचे नाव आपण सहन करतो हा आपल्या सहनशीलतेचा पराकोट – हर्षवर्धन सपकाळ

पिंपरी- एफस्टिन फाईल सारख्या विकृत प्रकरणात आपल्या पंतप्रधानांचे नाव असल्यावरही आपण त्यांना सहन करतोय, हा आपल्या सहनशीलतेचा पराकोट आहे. आता रस्त्यावर सविनय उतरल्याशिवाय, सत्याग्रहाशिवाय कोणताही मार्ग दिसत नाही. आता आपण दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याला तयार आहोत का ? या प्रश्नाचे सगळ्यांनी चिंतन करावे. जर आपण जिवंत असाल, मेलेलो नाही अशी स्वतःला खात्री असेल तर आता सर्वजण…

Read More

सर्वधर्मसमभाव हाच खरा राष्ट्रवाद – विजय तांबे

पिंपरी- सर्वधर्मसमभाव हीच भारताची ओळख आणि हाच खरा राष्ट्रवाद आहे. १८८५ मध्ये जात, धर्म, भाषा, वर्ण, रंग, वंश हे सर्व सोडून हिंदू, पारशी, ख्रिश्चन, मुसलमान, शीख समाजातील नागरिक एकत्र येऊन त्यांनी काँग्रेसची स्थापना केली. हीच भारत राष्ट्र उभारणीची सुरुवात होय. भारतात एकत्वाची भावना निर्माण करून त्याचे नेतृत्व करण्याचे काम महात्मा गांधीजींनी केले.दलित समाजाला आत्मसन्मान मिळवून…

Read More

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान प्रदान

पिंपरी -‘कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नावाचा जीवनगौरव सन्मान मिळाल्याने मी कृतार्थ झालो आहे. राळेगणसिद्धी हे गाव आदर्शगाव होण्यासाठी टाटा मोटर्सचे निवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर यांचे फार मोठे योगदान आहे!’ अशी कृतज्ञतेची भावना ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी आदर्शगाव राळेगणसिद्धी येथे व्यक्त केली. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने अण्णा…

Read More

आनंदाचा बटवा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न

पिंपरी – ”आनंदाचा बटवा’ या काव्यसंग्रहातून वाचकांनी आनंद घ्यावा आणि इतरांनाही आनंद वाटून जीवनाचा प्रवास समाजाचे ऋण फेडत समाधानाकडे वाटचाल करणारा ठरावा!’ असे विचार डाॅ. संजय जगताप यांनी तारांगण सभागृह, सायन्स पार्क, चिंचवड येथे व्यक्त केले. कवी संजय होनकळस लिखित आणि काव्यमित्र संस्था आयोजित ‘आनंदाचा बटवा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना डॉ. संजय जगताप बोलत होते….

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन हे केवळ आर्थिक नव्हे,तर राष्ट्रीय जबाबदारीचे प्रतीक – कामगारनेते यशवंतभाऊ भोसले

पिंपरी:– जगामध्ये सध्या सुरु असलेल्या आखाती युद्धामुळे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असून, त्याची झळ भारतासारख्या विकसनशील देशांनाही बसत आहे. कच्च्या तेलाचे वाढते दर, मजबूत होत चाललेला अमेरिकन डॉलर, रुपयाची घसरण आणि आयात खर्चातील वाढ यामुळे भारतातील महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.  पंतप्रधान  नरेंद्र मोदी  यांनी देशहिताच्या दृष्टीने नागरिकांना सोने-चांदी खरेदी, पेट्रोल-डिझेल वापर तसेच…

Read More

अंतर्नाद’ या संगीत नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवारी चिंचवड मध्ये

पिंपरी- पंढरीची वारी हा जगातील एकमेव सोहळा आहे की, या सोहळ्यात सर्व अठरा पग्गड जाती एकत्र येऊन वारी मध्ये सहभागी होतात. देहू, आळंदी पासून पंढरपूर पर्यंत वारीत सहभागी होण्याचे आत्मिक समाधान हे अडीच तासात देण्याचा प्रयत्न “अंतर्नाद” या संगीत नाटकातून प्रेक्षकांना मिळेल. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या पसंतीला उतरेल असा ५१ कलाकारांचा सहभाग असलेल्या या…

Read More

देशाच्या विकासामध्ये श्रमिकांचा सिंहाचा वाटा हे कदापी विसरून चालणार नाही – कामगार नेते यशवंतभाऊ भोसले

पिंपरी- : कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने संत तुकाराम नगर , पिंपरी, पुणे येथे राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. श्रमिकांचे कष्ट, त्याग आणि संघर्ष यामुळेच भारत देशाचा विकास झाला असून त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही, असे गौरवोद्गार कामगार नेते व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंतराव भोसले यांनी काढले. राष्ट्रीय…

Read More

सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन

पुणे | प्रतिनिधी :गायन करताना केवळ इतरांचे अनुकरण करून गाणे सादर करणे पुरेसे नसून, गाण्यांतील भाव समजून ते श्रोत्यांच्या मनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे पट्टशिष्य व ख्यातनाम शास्त्रीय गायक पं. उपेंद्र भट यांनी केले. सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित २४ व्या ‘पुणे आयडॉल’ गायन स्पर्धेचे उद्घाटन पं. उपेंद्र भट…

Read More

मार्क्सवादाची ‘सांस्कृतिक क्रांती’ ही केवळ भ्रांती – प्रा. डॉ. प्रसन्न देशपांडे

पिंपरी, – ‘जगातील सांस्कृतिक पडझडीचा विचार करता मार्क्सवादाने सांस्कृतिक क्रांती घडवली, ही केवळ भ्रांती असून भारतात मार्क्सवाद कधीच रुजला नाही!’ असे ठाम प्रतिपादन प्रा. डॉ. प्रसन्न देशपांडे यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला २०२६ च्या अंतिम सत्रात ते बोलत होते. याच कार्यक्रमाने तीन दिवसीय व्याख्यानमालेची…

Read More