ब्रेकिंग न्यूज

दुर्गा टेकडी: अभियांत्रिकी विश्वातील तीन क्षेत्रांचा संगम असलेला देशातील एकमेव प्रकल्प

भोपाळ, मध्य प्रदेश येथे शहर विकास मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्यरत असलेले प्रशासकीय अधिकारी संकेत भोंडवे (IAS) यांनी निगडी येथील दुर्गा टेकडी बद्दल असलेल्या आपल्या भावना आणि काही आठवणी सांगितल्या आहेत. वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरें। पक्षीही सुस्वरें आळविती ॥१॥ येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुणदोष अंगा येत ॥२॥ आकाश मंडप पृथिवी आसन। रमे तेथे…

Read More

निगडीत लॉजमध्ये तरुणाची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी खोलीत घडलं काय ? 

पिंपरी – निगडी परिसरात एका 26 वर्षीय तरुणाने लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. यश कदम असे या मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश हा सोमवारी निगडीतील एका लॉजमध्ये गेला होता. काही वेळानंतर खोलीत यश हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. यशला उपचारासाठी…

Read More

पहिल्या पत्नीची आर्थिक फसवणूक करून पतीचे दुसरे लग्न; जाब विचारताच मारहाण 

पुणे- पहिल्या पत्नीला विश्वासात घेऊन तिची मोठी आर्थिक फसवणूक केली. तसेच तिला अंधारात ठेवून दुसरे लग्न केले. या कृत्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पहिल्या पत्नीला बेदम मारहाण केल्याचा एक धक्कादायक प्रकार पुण्याच्या चऱ्होली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चऱ्होली येथील ‘आस्था डेव्हलपर्स’ बिल्डिंगमध्ये घडला आहे. संशयित…

Read More

विषारी दारू दुर्घटना प्रकरणी दोन पोलीस अधिकारी निलंबित

विषारी दारू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपीच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून दोन बड्या पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पुणे अवैध विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापतीच्या संपर्कात असल्याचे कॉल रेकॉर्ड समोर आल्यानंतर उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी अजित शिवाजी काळे आणि सुमित नंदकुमार वाघ यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे….

Read More

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विषारी दारू दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांची घेतली भेट 

दापोडी – विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे व शिवसेना उपनेते कामगार नेते इरफान सय्यद यांची घटनास्थळी भेट पुण्यातील दापोडी व फुगेवाडी या परिसरात विषारी दारूच्या सेवनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना घडली. विषारी दारूच्या सेवनाने मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग…

Read More

शिवनेर पतसंस्थेला 1 कोटी 20 लाखांचा नफा 

पिंपरी – भोसरी येथील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेला 2025- 26 या आर्थिक वर्षांमध्ये 1 कोटी 20 लाख 59 हजार 356 इतका निव्वळ नफा झाला आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ यांनी दिली. संस्थेचे एकूण 4403 इतके सभासद असून रु. 2 कोटी 76 लाख 78 हजार 250 इतके भागभांडवल आहे. संस्थेकडे रु. 39 कोटी 95…

Read More

विकृत प्रकरणात पंतप्रधानांचे नाव आपण सहन करतो हा आपल्या सहनशीलतेचा पराकोट – हर्षवर्धन सपकाळ

पिंपरी- एफस्टिन फाईल सारख्या विकृत प्रकरणात आपल्या पंतप्रधानांचे नाव असल्यावरही आपण त्यांना सहन करतोय, हा आपल्या सहनशीलतेचा पराकोट आहे. आता रस्त्यावर सविनय उतरल्याशिवाय, सत्याग्रहाशिवाय कोणताही मार्ग दिसत नाही. आता आपण दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याला तयार आहोत का ? या प्रश्नाचे सगळ्यांनी चिंतन करावे. जर आपण जिवंत असाल, मेलेलो नाही अशी स्वतःला खात्री असेल तर आता सर्वजण…

Read More

सर्वधर्मसमभाव हाच खरा राष्ट्रवाद – विजय तांबे

पिंपरी- सर्वधर्मसमभाव हीच भारताची ओळख आणि हाच खरा राष्ट्रवाद आहे. १८८५ मध्ये जात, धर्म, भाषा, वर्ण, रंग, वंश हे सर्व सोडून हिंदू, पारशी, ख्रिश्चन, मुसलमान, शीख समाजातील नागरिक एकत्र येऊन त्यांनी काँग्रेसची स्थापना केली. हीच भारत राष्ट्र उभारणीची सुरुवात होय. भारतात एकत्वाची भावना निर्माण करून त्याचे नेतृत्व करण्याचे काम महात्मा गांधीजींनी केले.दलित समाजाला आत्मसन्मान मिळवून…

Read More

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान प्रदान

पिंपरी -‘कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नावाचा जीवनगौरव सन्मान मिळाल्याने मी कृतार्थ झालो आहे. राळेगणसिद्धी हे गाव आदर्शगाव होण्यासाठी टाटा मोटर्सचे निवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर यांचे फार मोठे योगदान आहे!’ अशी कृतज्ञतेची भावना ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी आदर्शगाव राळेगणसिद्धी येथे व्यक्त केली. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने अण्णा…

Read More

आनंदाचा बटवा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न

पिंपरी – ”आनंदाचा बटवा’ या काव्यसंग्रहातून वाचकांनी आनंद घ्यावा आणि इतरांनाही आनंद वाटून जीवनाचा प्रवास समाजाचे ऋण फेडत समाधानाकडे वाटचाल करणारा ठरावा!’ असे विचार डाॅ. संजय जगताप यांनी तारांगण सभागृह, सायन्स पार्क, चिंचवड येथे व्यक्त केले. कवी संजय होनकळस लिखित आणि काव्यमित्र संस्था आयोजित ‘आनंदाचा बटवा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना डॉ. संजय जगताप बोलत होते….

Read More