ब्रेकिंग न्यूज

UGC-NETच्या तीन विषयांच्या परीक्षा पुन्हा होणार ; परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली – नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) प्रश्नपत्रिकांमधील गंभीर त्रुटी आणि चुकांमुळे यूजीसी-नेट (UGC-NET) जून २०२६ च्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांची परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. यंदा २२ ते ३० जूनदरम्यान UGC-NET परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, या परीक्षेतील इंग्रजी,…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील मानसिक नक्षलवादावर नेमके काय म्हणाले ?

मोदीनी लाल किल्ल्यावर 13 व्या वेळी फडकावला तिरंगा नवी दिल्ली- सशस्त्र नक्षलवाद्यांविरोधातील लढ्यात देशाला मोठे यश मिळाले असले, तरी माओवादी विचारसरणीचा प्रभाव असलेल्या तथाकथित ‘मानसिक नक्षलवाद्यां’ना ओळखून त्यांना समाजापासून वेगळे करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर सकाळी साडेसात वाजता तिरंगा…

Read More

या तारखेपासून धावणार भारताची पहिली बुलेट ट्रेन ; तिकीट किती असणार?

मुंबई- भारतातील पहिली बुलेट ट्रेन सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु असून मुंबई-अहमदाबाद मार्गांवर ही बुलेट ट्रेन धावणार आहे. ही ट्रेन आपला पाहिला प्रवास कधी सुरु करणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. संपूर्ण मुंबई ते अहमदाबाद मार्ग २०२९ पर्यंत पूर्णपणे सुरू होण्याचा…

Read More

मोठी बातमी : राजधानी दिल्लीमध्ये हायकोर्टसह ६ ठिकाणी बॉम्बची धमकी, तपास यंत्रणा सतर्क 

नवी दिल्ली- राजधानीतील दिल्ली हायकोर्टसह आणखी 5 महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्याची ई-मेलद्वारे धमकी आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ही खळबळजनक माहिती समोर आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने हायकोर्टाच्या अधिकृत मेलवर स्फोट घडवण्याची धमकी पाठवली. मेल मिळताच न्यायालय परिसर तात्काळ बंद करून बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. परिसराची…

Read More

ट्रीपच्या अगोदर नो ‘टीप’ ! कॅब कंपन्यांच्या मनमानीला केंद्र सरकारचा चाप

नवी दिल्ली- कॅब किंवा रिक्षा बुक करताना किंवा प्रवासादरम्यान आता चालकाला किंवा कंपन्यांना टीप मागता येणार नाही. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नवीन नियमांनुसार बंदी घालण्यात आली असून सर्व वाहन अ‍ॅग्रीगेटर्सना त्यांच्या मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्समधून हे पर्याय त्वरित हटवण्याचे आदेश दिले आहेत. अनेक कंपन्या ग्राहकांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेण्यासाठी अ‍ॅपच्या युझर इंटरफेस (UI) मध्ये राईड…

Read More

राम गोपाल वर्मा काढणार एन्काऊंटर स्पेशालिस्ट ‘दया नायक’ यांच्या जीवनावर सिनेमा

सत्या, कंपनी, डी, सरकार यासारखे अनेक गाजलेले सिनेमे देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे राम गोपाल वर्मा. गेल्या काही वर्षांपासून राम गोपाल वर्मा यांचे नाव बॉलिवूडमधून पुसले गेल्यासारखे झाले आहे. कारण त्यांचे थरारक सिनेमे पाहण्याची संधी बॉलिवुडप्रेमीना खूप वर्षांपासून मिळालेली नाही. पण आता प्रतीक्षा संपली आहे. लवकरच राम गोपाल वर्मा एका नाव सिनेमा घेऊन येणार आहेत. कोणता…

Read More

आपले नाव मतदार यादीमधून वगळले जाऊ शकते, आजच एसआयआर गणना अर्ज भरा

मुंबई- राज्यातील मतदारयादीच्या विशेष सखोल पुनर्रीक्षण (एसआयआर) प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत अद्याप सुमारे १ कोटी ८० लाख मतदार गणना या प्रक्रियेबाहेर राहिल्याची माहिती समोर आली आहे. या उर्वरित मतदारांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १७ ऑगस्ट २०२६ पर्यंतचीच अंतिम मुदत शिल्लक आहे. विहित मुदतीत त्यांनी अर्ज न भरल्यास त्यांची नावे प्रारूप मतदारयादीतून वगळली जाण्याची…

Read More

नाशिक फाटा ते राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरची निविदा येत्या पंधरा दिवसांत

खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या भेटीनंतर गडकरी यांचे संबंधीत विभागाला तात्काळ निर्देश पुणे : नाशिक फाटा ते राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरची निविदा येत्या पंधरा दिवसांत मार्गी लागणार असून त्यानंतर लागलीच हे काम सुरू होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना यासंबंधी तातडीने लक्ष घालून निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी…

Read More

‘होय मी अंधभक्त !’ अनफॉलो करायचं असेल तर करा ; इशा कोप्पीकरने सुनावले

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल वापरण्यात आलेल्या अपमानास्पद भाषेवर आक्षेप घेतल्यामुळे ट्रोल झालेल्या अभिनेत्री ईशा कोप्पीकरने स्पष्ट शब्दांत “हो, मी देशासाठी अंधभक्त आहे, कोणाला अनफॉलो करायचं असेल तर करा,” असा सडेतोड पवित्रा घेतला आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईविषयी वापरण्यात आलेल्या अपमानास्पद शब्दांवर ईशा कोप्पीकरने तीव्र संताप व्यक्त…

Read More

कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली- कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ अपहरणाचा किंवा मानवी तस्करीचा गुन्हा (FIR) दाखल केलाच पाहिजे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याची अंमलबजावणी न करणाऱ्यांना राज्यांच्या गृह सचिव, पोलीस महासंचालकांच्या विरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात दररोज अनेक व्यक्ती बेपत्ता होतात. विशेषतः अल्पवयीन मुले गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे….

Read More