ब्रेकिंग न्यूज

श्री क्षेत्र आळंदी येथे दिवाळी पहाट संगीत महोत्सव

आळंदी:- श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात आज दि.29 रोजी दिवाळी पहाट संगीत महोत्सव-2024 या कार्यक्रमाला सुरवात झाली आहे.हा कार्यक्रम दि. 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर वेळ – सकाळी 6 वा. स्थळ – श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर, श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे होत आहे. आज मंगळवार – धनत्रयोदशी दि.29 ऑक्टोबर रोजी सायली तळवलकर…

Read More

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे लोकार्पण संपन्न

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहराच्या न्यायालयीन इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक व अभिमानास्पद ठरला. शहराला दीर्घ प्रतीक्षेनंतर स्वतःचे हक्काचे “जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय” मोरवाडी येथील जुनी न्यायालयीन इमारत येथे अत्यंत सन्माननीय वातावरणात व मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते झाडाच्या रोपाला पाणी घालून करण्यात आली. या न्यायालयाचे लोकार्पण मुंबई उच्च न्यायालयाचे…

Read More

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन

मुंबई- आपल्या मधुर आणि सुश्राव्य आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला असून संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेले योगदान…

Read More

दूध २ रुपयांनी तर दुग्धजन्य पदार्थ १० टक्क्यांनी वाढणार, मंगळवारपासून दरवाढ लागू

मुंबई- इंधनाच्या दरामध्ये वाढ, पॅकिंगच्या कच्च्यामालाच्या दरामध्ये वाढ तसेच साखरेचे भाव वाढल्यामुळे गे आणि म्हशीच्या पिशवीबंद दुधाच्या दारात २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय राज्यातील खासगी, सहकारी दूध संघानी घेतला आहे. ही दरवाढ येत्या मंगळवार (दि. ११) पासून लागू होणार आहे. राज्यातील प्रमुख खासगी आणि सरकारी दूध संघांच्या सभासदांची बैठक आज, शुक्रवारी कात्रज डेअरी येथे झाली….

Read More

लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक २०२६ सादर ; काय आहेत तरतुदी ?

नवी दिल्ली- सीजेपीच्या आंदोलनानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी लोकसभेत ‘लोक परीक्षा (अनुचित साधन निवारण) दुरुस्ती विधेयक २०२६ मांडण्यात आले. २०२४ च्या कायद्याला अधिक प्रभावी बनवण्यासाठी शिक्षेच्या आणि तपासाच्या तरतुदी अधिक कठोर करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत भरती आणि प्रवेश परीक्षांतील पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो उमेदवारांचे नुकसान झाले. अनेक…

Read More

संवर्धनानंतर रांजणगाव महागणपती मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले ! दर्शनासाठी भाविकांची गर्दी

संवर्धनानंतर रांजणगाव महागणपती मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले ! दर्शनासाठी भाविकांची गर्दी रांजणगाव – अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती येथील श्री महागणपती मंदिरात महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागातर्फे केलेल्या जतन व संवर्धनाच्या कामांनंतर शनिवार (दि.१) रोजी पहाटे मंदिर पुन्हा भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिरातील जतन व संवर्धनाच्या कामासाठी १५ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत…

Read More

मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द

मुंबई- मुंबई महापालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेविका आणि माजी महापौर विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द झाले आहे. त्यांच्यावर पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने राज्याच्या नगरविकास विभागाकडून यासंदर्भातील अधिसूचना मध्यरात्री जारी करण्यात आली आहे. सोमवारी सभागृहात त्यांच्या पदमुक्तीची कायदेशीर घोषणा केली जाणार आहे. पालघर जिल्हा जात…

Read More

विलास मडिगेरी यांचे कार्य संस्कृती व सामाजिक भान जोपासणारे: आ. शंकर जगताप

  भोसरी (प्रतिनिधी) :- भारतीय जनता पक्षात सर्वांसोबत उभे राहणारे मार्गदर्शक म्हणून विलास मडिगेरी यांची ओळख आहे. वाढदिवस साजरा करताना देखील ते संस्कृती व सामाजिक भान जोपासता. वर्षभर त्यांच्याकडून अखंड २० वर्षांपासून सातत्याने राबविले जाणारे उपक्रमही वाखागण्याजोगे असतात. समाजकारण, राजकारणात नव्याने काम करू पाहणा-या सर्वांनी त्यांच्याकडून हे शिकले पाहिजे, असे गौरवोद्गार चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर…

Read More

भंडारा डोंगरावर दशमी सोहळा संपन्न

देहू, : वारकरी संप्रदायात अनन्य साधारण महत्त्व असलेला आणि एक मोठी परंपरा लाभलेला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अनुग्रह दिवस असलेला अर्थात माघ शुद्ध दशमीचा सोहळा आज श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने डोंगरावर दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. माघ शुद्ध दशमी हा जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचा अनुग्रह दिवस म्हणून ओळखला…

Read More

राज्य मंत्रीमंडळाची शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला मंजुरी

मुंबई – राज्यातील लाखो शेतकरी ज्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत होते, त्या शेतकरी कर्जमाफी योजनेला अखेर राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने आपला…

Read More