ट्रीपच्या अगोदर नो ‘टीप’ ! कॅब कंपन्यांच्या मनमानीला केंद्र सरकारचा चाप
नवी दिल्ली- कॅब किंवा रिक्षा बुक करताना किंवा प्रवासादरम्यान आता चालकाला किंवा कंपन्यांना टीप मागता येणार नाही. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नवीन नियमांनुसार बंदी घालण्यात आली असून सर्व वाहन अॅग्रीगेटर्सना त्यांच्या मोबाईल अॅप्लिकेशन्समधून हे पर्याय त्वरित हटवण्याचे आदेश दिले आहेत. अनेक कंपन्या ग्राहकांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेण्यासाठी अॅपच्या युझर इंटरफेस (UI) मध्ये राईड…
