ब्रेकिंग न्यूज

साहित्य निर्मितीची प्रेरणा शाळेतूनच कादंबरीकार विश्वास पाटील

  भोसरी वेध न्यूज – साहित्याची प्रेरणा जिल्हा परिषदेच्या शाळेत असतानाच गुरुजनांमुळे झाली. मराठी साहित्यात विपुल लेखन करत असतानाच माझी लेखणी शिवरायांच्या पावला जवळ येऊन थांबली आणि निर्माण झाली महाकादंबरींची मालिका. मराठी साहित्य टिकवायचे असेल तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत असे प्रतिपादन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी भोसरी…

Read More

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात आरक्षण उपवर्गीकरण ताबडतोब लागू करा

मुंबई प्रतिनिधी -राज्यात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्तरावर मागास राहिलेल्या मांग, मातंग, व इतर समाजाला आरक्षणाचे वर्गीकरण करून न्याय द्यावा, या प्रमुख मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आज मंगळवारी (ता. २०) या समाजाचा जनआक्रोश मोर्चा च्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. या मोर्चात सत्ताधारी पक्षाचे आमदार, विविध पदाधिकारी यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी…

Read More

पार्थ पवार यांनी घेतली आमदार अमित गोरखेंची भेट

पिंपरी -विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या यामध्ये प्रामुख्याने विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांची  भेट घेतली या भेटीदरम्यान आपल्याला विधान परिषद मिळाल्यामुळे आमच्या उमेदवारांचा पिंपरी विधानसभेच्या विजयाचा मार्ग हा सुखकर झाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. दरम्यान आमदार अमित गोरखे यांची पिंपरी विधानसभेच्या 398 बुथ वरती पकड…

Read More

कामगार ,श्रमिकांची पिळवणूक व आर्थिक शोषण थांबावे– कामगारनेते यशवंतभाऊ भोसले

पिंपरी :– महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय कामगार आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांच्या वतीने संत तुकाराम नगर येथील संत तुकाराम महाराज हॉल येथे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तुकाराम नगर येथून निघालेल्या बाईक रॅलीचा समारोप पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ बाबासाहेब यांच्या पुतळ्याला…

Read More

मंदिरांसोबतच शैक्षणिक दालने उभारणे काळाची  गरज- श्री १०८ देवनंदिजी महाराज 

चिंचवड(प्रतिनिधी) जो पर्यंत आपले मंदिरे- मुर्त्या सुरक्षित आहे तोपर्यंत आपला समाज कुटुंब सुरक्षित आहे. मात्र केवळ मंदिरे उभारून मुर्त्या स्थापन करून भागणार नाही तर समाजातील गरीब मुलांसाठी शैक्षणिक दालने उभी करणे गरजेचे आहे. आम्ही लोकनिधीतून  चांदवड( नाशिक) येथे गरीब मुलांसाठी एज्युकेशन हब सुरु करीत आहोत. असे प्रतिपादन परमपूज्य सर्वोदय राष्ट्रसंत प्रज्ञाश्रमण सरस्वताचार्य श्री १०८ देवनंदिजी…

Read More

नारायण सुर्वे हे कवितेतील सूर्य! – डाॅ. श्रीपाल सबनीस

पिंपरी – ‘कविवर्य नारायण सुर्वे हे कवितेतील सूर्य होते. त्यांची कविता मानवमुक्तीची कविता आहे!’ असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी सायन्स पार्क सभागृह, चिंचवड येथे काढले. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिका प्रा. सुरेखा कटारिया यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव…

Read More

महापालिका नोकर भरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्यावा – माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सुधारित आकृतिबंधास मंजुरी देताना महापालिका नोकरभरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्याची मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे ऑगस्ट २०२३ मध्ये सुधारित आकृतीबंध राज्य शासनाकडे पाठविला असून त्यास अद्यापदेखील मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे महापालिकेतील सर्व विभागातील एकूण ४ हजार ७८४…

Read More

७७ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी पूर्णत्वास पुणे पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातून सुमारे २५ हजार स्वयंसेवकांचा सहभाग

पिंपरी-चिंचवड – सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंदाचे दिव्य स्वरूप – ७७व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन १६ ते १८ नोव्हेंबर रोजी संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेखाली होणार असून त्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. समागमाच्या पूर्वतयारीमध्ये पुणे पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातून सुमारे २५…

Read More

पत्रकारिता संपली तर समाज संपेल – ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई

पिंपरी, पुणे – पत्रकारिता आणि साहित्याचा जवळचा संबंध आहे. पत्रकारांनी वेगवेगळ्या क्षेत्रात रस निर्माण करून काम करावे. त्यामुळे लिखाण व्यापक, फुलेल आणि बहुअंगी होईल. पत्रकारांनी प्रचंड वाचन केले पाहिजे. मोजके आणि सकस लिहिले पाहिजे. वाटेल ते लिहू नये. चुकीवर प्रहार करावा आणि चांगल्याला चांगले म्हणावे, त्याचे कौतुक करावे. पत्रकारांनी भूमिका घेतली पाहिजे. पत्रकारिता संपली, तर…

Read More

२६ व्या स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवाची दिमाखात सांगता 

 पिंपरी – मराठी सारस्वताचा अभिमान पु. ल. देशपांडे यांच्या जयंती निमित्त पु. ल. लिखित सखाराम बाईंडर या सुप्रसिद्ध नाटकावर आधारित मंगेश सातपुते यांनी दिग्दर्शित केलेले ‘मॅड सखाराम’ हे विडंबन नाट्य २६ व्या स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप प्रसंगी सादर केले. समाजातील विविध वृत्ती – प्रवृत्तींवर या नाटकाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः सखारामाची भूमिका करणारे…

Read More