ब्रेकिंग न्यूज

Vedh News.com

भावी काळात बहुभाषिक कौशल्य महत्त्वाचे! – डॉ. सविता केळकर

  पिंपरी – ‘जागतिक पातळीवर भावी काळात बहुभाषिक कौशल्य महत्त्वाचे असून ते आत्मसात करणे गरजेचे आहे!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ जर्मन भाषातज्ज्ञ डॉ. सविता केळकर यांनी केले. भाषा अकॅडमी, पिंपरी आयोजित परकीय भाषा शिक्षक परिषद २०२६ या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डाॅ. सविता केळकर बोलत होत्या. जर्मन भाषातज्ज्ञ अरविंद लिगाडे, ज्येष्ठ विद्यापीठ भाषा संचालक जावेद अत्तार, पुणे…

Read More

जाते श्रमसंस्कृतीचे प्रतीक! – पद्मश्री गिरीश प्रभुणे

पिंपरी – ‘जाते हे ग्रामसंस्कृती आणि श्रमसंस्कृतीचे प्रतीक आहे. बाई जात्यावर दळायला बसली की ओव्या सुचत आणि त्यातून आपले मौखिक लोकसाहित्य समृद्ध झाले!’ असे विचार ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी गोशाळा सभागृह, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे व्यक्त केले. शब्दधन काव्यमंच आयोजित जात्यावर दळताना साहित्य विश्वातील पहिल्या ‘सुंदर माझे जाते गं…’ या अभिनव कविसंमेलनाचे…

Read More

माणूस आणि निसर्ग यांचे नाते आई आणि लेकरासारखे -रंगनाथ महाराज नाइकडॆ

  मोशी – माणूस आणि निसर्ग यांचे नाते आई आणि लेकरासारखे आहे.आई लेकराला जन्म देते ,वाढवते, त्याच्या ओंजळीत सार विश्व रीतं करते पण लेकरू मोठ झाल की आईलाच विसरतं म्हणून माणसाची विचित्र अवस्था झाली आहे तर पर्यावरणावर हि वेळ आली आहे.असे मत रंगनाथ महाराज नाईकडे यांनी व्यक्त केले. पर्यावरणाविषयी विविध अध्यात्माचे दाखले देत मार्गदर्शन केले….

Read More

पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्म परिसरात १.5 लाख वृक्षांचे भव्य रोपण; ‘देवराई’ विकास उपक्रमाचा शुभारंभ

पिंपरी -जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या वतीने पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म परिसरात सुमारे 92 प्रजातींच्या तब्बल 1.5 लाख वृक्षांचे रोपण करून या परिसरात देवराई विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. राज्य शासनाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन नगरसेवक संदीप वाघेरे आणि विभागीय वन अधिकारी करजे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी…

Read More

विकृत प्रकरणात पंतप्रधानांचे नाव आपण सहन करतो हा आपल्या सहनशीलतेचा पराकोट – हर्षवर्धन सपकाळ

पिंपरी- एफस्टिन फाईल सारख्या विकृत प्रकरणात आपल्या पंतप्रधानांचे नाव असल्यावरही आपण त्यांना सहन करतोय, हा आपल्या सहनशीलतेचा पराकोट आहे. आता रस्त्यावर सविनय उतरल्याशिवाय, सत्याग्रहाशिवाय कोणताही मार्ग दिसत नाही. आता आपण दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याला तयार आहोत का ? या प्रश्नाचे सगळ्यांनी चिंतन करावे. जर आपण जिवंत असाल, मेलेलो नाही अशी स्वतःला खात्री असेल तर आता सर्वजण…

Read More

सर्वधर्मसमभाव हाच खरा राष्ट्रवाद – विजय तांबे

पिंपरी- सर्वधर्मसमभाव हीच भारताची ओळख आणि हाच खरा राष्ट्रवाद आहे. १८८५ मध्ये जात, धर्म, भाषा, वर्ण, रंग, वंश हे सर्व सोडून हिंदू, पारशी, ख्रिश्चन, मुसलमान, शीख समाजातील नागरिक एकत्र येऊन त्यांनी काँग्रेसची स्थापना केली. हीच भारत राष्ट्र उभारणीची सुरुवात होय. भारतात एकत्वाची भावना निर्माण करून त्याचे नेतृत्व करण्याचे काम महात्मा गांधीजींनी केले.दलित समाजाला आत्मसन्मान मिळवून…

Read More

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान प्रदान

पिंपरी -‘कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नावाचा जीवनगौरव सन्मान मिळाल्याने मी कृतार्थ झालो आहे. राळेगणसिद्धी हे गाव आदर्शगाव होण्यासाठी टाटा मोटर्सचे निवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर यांचे फार मोठे योगदान आहे!’ अशी कृतज्ञतेची भावना ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी आदर्शगाव राळेगणसिद्धी येथे व्यक्त केली. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने अण्णा…

Read More

आनंदाचा बटवा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न

पिंपरी – ”आनंदाचा बटवा’ या काव्यसंग्रहातून वाचकांनी आनंद घ्यावा आणि इतरांनाही आनंद वाटून जीवनाचा प्रवास समाजाचे ऋण फेडत समाधानाकडे वाटचाल करणारा ठरावा!’ असे विचार डाॅ. संजय जगताप यांनी तारांगण सभागृह, सायन्स पार्क, चिंचवड येथे व्यक्त केले. कवी संजय होनकळस लिखित आणि काव्यमित्र संस्था आयोजित ‘आनंदाचा बटवा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना डॉ. संजय जगताप बोलत होते….

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन हे केवळ आर्थिक नव्हे,तर राष्ट्रीय जबाबदारीचे प्रतीक – कामगारनेते यशवंतभाऊ भोसले

पिंपरी:– जगामध्ये सध्या सुरु असलेल्या आखाती युद्धामुळे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असून, त्याची झळ भारतासारख्या विकसनशील देशांनाही बसत आहे. कच्च्या तेलाचे वाढते दर, मजबूत होत चाललेला अमेरिकन डॉलर, रुपयाची घसरण आणि आयात खर्चातील वाढ यामुळे भारतातील महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.  पंतप्रधान  नरेंद्र मोदी  यांनी देशहिताच्या दृष्टीने नागरिकांना सोने-चांदी खरेदी, पेट्रोल-डिझेल वापर तसेच…

Read More

अंतर्नाद’ या संगीत नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवारी चिंचवड मध्ये

पिंपरी- पंढरीची वारी हा जगातील एकमेव सोहळा आहे की, या सोहळ्यात सर्व अठरा पग्गड जाती एकत्र येऊन वारी मध्ये सहभागी होतात. देहू, आळंदी पासून पंढरपूर पर्यंत वारीत सहभागी होण्याचे आत्मिक समाधान हे अडीच तासात देण्याचा प्रयत्न “अंतर्नाद” या संगीत नाटकातून प्रेक्षकांना मिळेल. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या पसंतीला उतरेल असा ५१ कलाकारांचा सहभाग असलेल्या या…

Read More