पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन हे केवळ आर्थिक नव्हे,तर राष्ट्रीय जबाबदारीचे प्रतीक – कामगारनेते यशवंतभाऊ भोसले
पिंपरी:– जगामध्ये सध्या सुरु असलेल्या आखाती युद्धामुळे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असून, त्याची झळ भारतासारख्या विकसनशील देशांनाही बसत आहे. कच्च्या तेलाचे वाढते दर, मजबूत होत चाललेला अमेरिकन डॉलर, रुपयाची घसरण आणि आयात खर्चातील वाढ यामुळे भारतातील महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहिताच्या दृष्टीने नागरिकांना सोने-चांदी खरेदी, पेट्रोल-डिझेल वापर तसेच…
