महिलेच्या मोबाईलवर मेसेज केला आणि जीव गेला, पुण्यातून इसमाचे अपहरण करत सांगलीत निर्घृण हत्या
सांगली – नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज केल्याच्या किरकोळ कारणावरून एकाला आपला जीव गमवावा लागला. तीन तरुणांनी त्यांचे पुण्यातून अपहरण करून सांगलीला नेऊन त्यांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सांगली शहर पोलिसांना मिळालेल्या एका छोट्याशा ‘क्ल्यू’मुळे या भयंकर गुन्ह्याचा अवघ्या पाच दिवसांत उलगडा झाला आहे. गोविंद माधवराव उपासे (वय 59, रा. तपोधाम सोसायटी…
