कळसूबाई शिखरावर रात्रीच्या अंधारात वाट चुकलेल्या आठ पर्यटकांची सुटका
अकोले- कळसुबाई, हरिश्चंद्र गडावर ट्रेकसाठी गेले असताना रात्रीच्या अंधारात वाट चुकलेल्या मुंबईच्या आठ पर्यटकांची वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप सुटका केली. याबाबतची माहिती अशी की, मुंबईतील चार पर्यटक कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी बुधवारी आले होते. सोबत कुणीही वाटाड्या किंवा माहितगार माणूस न घेता हे कळसुबाई शिखराच्या दिशेने निघाले. वाटेत हिरवागार निसर्ग, अधून मधून पावसाच्या सरींचा आनंद घेत…
