राज्यात धार्मिक ध्रुवीकरण रोखण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा
पिंपरी- मागील अकरा वर्षांपासून निवडणूक काळात देशभर जाती – धर्मात तेढ निर्माण करीत, धार्मिक ध्रुवीकरण करून मतांची मागणी केली जात आहेत. त्यामुळे अल्पसंख्याकांसह सर्व छोट्या सामाजिक घटकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पुरोगामी विचारांचा पुरस्कार करीत शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांना आदर्श मानून महाराष्ट्र नेहमीच देशात अग्रेसर राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीत…
