सुर्वे माणुसकीचा कैवार घेणारे कवी! – डाॅ. श्रीपाल सबनीस
पिंपरी – ‘नारायण सुर्वे हे माणुसकीचा कैवार घेणारे कवी होते!’ असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आदर्शगाव हिवरेबाजार, जिल्हा अहिल्यानगर येथे काढले. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आयोजित काव्यजागर संमेलनात डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. महाराष्ट्र शासनाच्या आदर्शगाव संकल्प आणि प्रकल्पाचे…
