ब्रेकिंग न्यूज

महायुतीत धुसफूस आहे ? अजित पवार यांची स्पष्टोक्ती, म्हणाले…

Share

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत वाद झाल्याने अजित पवार रागात बैठक सोडून निघून गेल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबतच्या चर्चांवर अजित पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाद झाल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. अजित पवार यांना आज त्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “१० वाजता कॅबिनेट मीटिंग होती. पहिला कार्यक्रम अहमदपूरला होता. मला कॅन्सल करायचा होता. मला फोन आला. म्हटलं येणार नाही. ते म्हणाले हारफुले काही देणार नाही. शेतकऱ्यांचा मेळावा आहे. मी १० वाजता तिथे कॅबिनेटला पोहोचलो. साडे बाराला उठलो. १ला टेकऑफ घेतला. आणि तो कार्यक्रम केला. त्यापेक्षा काही नाही. एखाद्याला विमान पकडायचं असेल तर माणूस जातो ना. त्यापेक्षा काही नाही. पहिले सर्वात महत्त्वाचे विषय घेतले गेले. कोणते विषय हे मला माहीत होते. त्यामुळे त्या बातमीत तथ्य नाही. हे जबाबदारीने सांगतो. नाही बाबा, धुसफूस अजिबात नाही. कुठलं चित्र नाही. ऑल इज वेल”, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी यावेळी दिलं.

“आमचे ४० ते ४२ सिटींग आहे. समोरच्या बाजूला तेवढ्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे त्यांना संधी आहे. आमच्याकडे १२ ते १५ रिक्त आहे. जेव्हा आम्ही बसू तेव्हा आम्हाला कळेल. त्यांनी आयाराम गयारामांबद्दल काय विधान केलं होतं. आता ते काय बोलत आहेत, कुणाला घेत आहेत हे पाहिलं असेल. शेवटी जनता जनार्दन आणि नेतेही महत्त्वाचे असते. आम्ही नेत्यांना घेण्याऐवजी सिने अभिनेत्यांपासून सुरुवात केली आहे”, असं अजित पवार यावेळी म्हणाले. “परवा कार्याध्यक्षांचं स्टेटमेंट वाचलं. आमच्या महायुतीचे मतदारसंघ कुणाला मिळणार हे जाहीर झालं नाही. बारामती आमच्याकडे आले तर प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलेली अंमलबजावणी केली पाहिजे. पण बारामती आमच्याकडे आला पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *