ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्राच्या उभारणीत एस. बी. पाटील यांचे मोलाचे योगदान – मधूकर भावे

पिंपरी- संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राज्याच्या कृषी, औद्योगिक विकासावर भर देण्यात आला. तो काळ १९६० चा होता. त्यावेळी यशवंतराव चव्हाण, आचार्य अत्रे, केशवराव जेधे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वासोबत शंकरराव बाजीराव पाटील ऊर्फ भाऊ यांनी जबाबदारीने कार्य केले. भाऊंनी रोजगार हमी योजनेतील कामगारांना वेतन आणि धान्य देण्याचा निर्णय, कामगारांना किमान वेतन मिळाले पाहिजे, शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या धान्याला योग्य…

Read More

महापालिका भांडार विभागातील फर्निचर ची निविदा रद्द करावी : राहुल कोल्हटकर

पिंपरी (वेध न्यूज )  :-   पिंपरी चिंचवड महानगरपालिका भांडार विभागामार्फत शहरातील शाळांसाठी बाक तसेच टेबल खुर्ची खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया काढण्यात आली आहे.ही निविदा ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून काढण्यात आली आहे ती तातडीने रद्द करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोलटकर यांनी केली आहे. या संदर्भात कोल्हटकर यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात…

Read More

शहरात होणार जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर

पिंपरी, (प्रतिनिधी) – गेल्‍या अनेक वर्षांपासून वकील आणि नागरिकांच्‍या मागणीला अखेर यश आले असून शहरात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना व पदांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे शहरात आता या दोन वरिष्ठ न्‍यायालयांची स्‍थापना होणार असून पिंपरी-चिंचवडकरांना पुण्याला माराव्‍या लागणाऱ्या चकरा कमी होणार आहेत. शहरात ही न्‍यायालये…

Read More

विकृत प्रकरणात पंतप्रधानांचे नाव आपण सहन करतो हा आपल्या सहनशीलतेचा पराकोट – हर्षवर्धन सपकाळ

पिंपरी- एफस्टिन फाईल सारख्या विकृत प्रकरणात आपल्या पंतप्रधानांचे नाव असल्यावरही आपण त्यांना सहन करतोय, हा आपल्या सहनशीलतेचा पराकोट आहे. आता रस्त्यावर सविनय उतरल्याशिवाय, सत्याग्रहाशिवाय कोणताही मार्ग दिसत नाही. आता आपण दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याला तयार आहोत का ? या प्रश्नाचे सगळ्यांनी चिंतन करावे. जर आपण जिवंत असाल, मेलेलो नाही अशी स्वतःला खात्री असेल तर आता सर्वजण…

Read More

शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी – किरणजीत सिंग

पिंपरी, पुणे – शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी होते. बंदूक आणि तलवारीच्या जोरावर, ब्रिटिशांना भारतातून घालवून खरे स्वातंत्र्य मिळणार नाही, तर पूर्ण व्यवस्थाच बदलली पाहिजे. आत्ताचे स्वातंत्र्य हे भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद या क्रांतीकारकांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य नाही. त्यांना जातवाद, धर्मवाद, प्रांतवाद, भ्रष्टाचार मान्य नव्हता. आता होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांमुळे ते व्यथीत झाले असते….

Read More

सुसंवाद हा ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वाचा मूलमंत्र! – डॉ. संजय उपाध्ये

पिंपरी – ‘सुसंवाद हा ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वाचा मूलमंत्र आहे!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार डॉ. संजय उपाध्ये यांनी केले. गांधी पेठ तालीम मित्रमंडळ आयोजित ‘मन करा रे प्रसन्न!’ या मासिक प्रवचनमालिकेतील अमृतमहोत्सवी ७५ वे प्रवचनपुष्प गुंफताना ‘विचार करूनच बोला!’ या विषयावर डॉ. संजय उपाध्ये यांनी निरूपण केले. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, महापौर…

Read More

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात आरक्षण उपवर्गीकरण ताबडतोब लागू करा

मुंबई प्रतिनिधी -राज्यात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्तरावर मागास राहिलेल्या मांग, मातंग, व इतर समाजाला आरक्षणाचे वर्गीकरण करून न्याय द्यावा, या प्रमुख मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आज मंगळवारी (ता. २०) या समाजाचा जनआक्रोश मोर्चा च्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. या मोर्चात सत्ताधारी पक्षाचे आमदार, विविध पदाधिकारी यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी…

Read More

एमओसी कम्यूनिटी कॅन्सर सेंटरचे कल्याणी नगर येथे लोकार्पण

पुणे- एम. ओ. सी. कॅन्सर केयर एंड रिसर्च सेंटर या कर्करोगग्रस्तांचा प्रयास सुखकर करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या संस्थेने डिसेंबर महिन्यात आपले नवे कम्यूनिटी कॅन्सर सेंटर कल्याणी नगर, पुणे येथे रुग्णसेवेसाठी रुजू केले आहे. पुणे शहर, जिल्हा तसेच महाराष्ट्रात कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. उपचारांसाठी फक्त शासकीय व खाजगी इस्पितळांवर विसंबून राहणे तेथील महागडे उपचार, सेवा सुविधा…

Read More

रतन टाटा यांच्या स्मृती चिरंतन जतन करण्यासाठी शहरवासीयांनी पुढे यावे – प्रवीण तुपे

पिंपरी- पाच गावांचे एकत्रीकरण करून पिंपरी चिंचवड नगरपालिका स्थापन झाली. मेट्रो सिटी असा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी चिंचवडचे नाव घेतले जाते. यामधे उद्योगपती रतन टाटा यांचे अमूल्य योगदान आहे. त्यांच्या स्मृती चिरंतन जतन करण्यासाठी शहरवासीयांनी पुढे यावे असे आवाहन पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तुपे यांनी…

Read More

वर्ल्ड वॉटर फोरम मध्ये पीसीसीओईच्या विजय सावंतने केले प्रतिनिधित्व

पिंपरी, पुणे (वेध न्यूज )  बाली, इंडोनेशिया येथे आयोजित करण्यात आलेल्या “१० व्या वर्ल्ड वॉटर फोरम” मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल शाखेचा विद्यार्थी विजय रणजीत सावंत यास मिळाली. वर्ल्ड वॉटर फोरम मागील ३० वर्षांपासून पाणी समस्यांवर संशोधन करून उपाय सुचविणाऱ्या संशोधकांना जागतिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देणारी नामांकित संस्था आहे….

Read More